संगमनेरचा तालुका हादरला, तीन महिन्यापूर्वी लग्न झाले

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधि)

पुणे(दि.13 ऑगस्ट)

पुण्यातली नोकरी सोडून गावी परतले आणि एकाच दोरीला लटकून जीवन संपविले, संभाजी पुरीगोसावी (अह.नगर जिल्हा) प्रतिनिधी. हातावरची मेहंदी उतरली आणि सुखी संसाराची स्वप्ने रंगवण्याच्या काळात नवदाम्पत्याने घेतलेल्या निर्णयाने संपूर्ण गाव हादरले आहे, संगमनेरच्या साकुर गावात नवविवाहित दाम्पत्याने अचानक टोकाचा निर्णय घेतला आणि गावात एकच खळबळ उडाली तीनच महिन्यांपूर्वी लग्न झाले.

अन पुण्यातली नोकरी सोडून गावी परतले, आणि एकाच दोरीला लटकून या दोघांनीही जीवन संपवले आहे, ही दुर्दैवी आणि धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यांतील साकुर गावात घडली आहे, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे, वैभव आमले (वय 22) आणि स्नेहा आमले (वय 20) अशी नवविवाहित दाम्पत्याची नावे आहेत, याबाबत मिळालेल्या माहितीवरून वैभव आणि स्नेहा यांचे अवघ्या तीनच महिन्यापूर्वी लग्न झाले होते.

मात्र या नवविवाहित दाम्पत्याने रविवारी सायंकाळी साकुर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत गळफास घेवुन जीवन संपवले, या घटनेची माहिती स्थानिक रहिवासी आणि साकुर गावचे ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची माहिती घारगांव पोलिसांना दिली, घारगांव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेचा पंचनामा केला, असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही .

वैभव व स्नेहा दोघेही पुण्यात नोकरी करत होते, काही दिवसांपूर्वीच दोघेही संगमनेर येथील आपल्या गावी परतले होते, रविवारी संध्याकाळी या दोघांनीही एका झाडाला दोरी बांधून एकत्रच जगाचा निरोप घेतला, आमले दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याने संगमनेर तालुक्यांसह साकुर गावामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.