माय बाप सरकार शेतकरी बांधवांना उत्तर द्या My Bap Sarkar reply to the farmer brothers

172

🔹शेतकरी पुत्र विनोद उमरे.शेतकऱ्यांच्या हितासाठी 

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि. 22 एप्रिल) :-

        देशाचे सरकार शेतकर्याच्या विरोधात असल्याचा पितळ हळु हळु उघढे पडल्याचे दिसत आहे.. महागाई वर काही बोलत नाही सरकार सोयाबीन चे भाव ८००० हजार वरुन अचानक ४ हजार५००वर आले व कापूस १६ हजार वरुन ७ हजार ८०० वर आले याचे कारण माय बाप सरकारनी शेतकर्याना द्यावे..पि.व्ही.सी पाईप ३५० रुपया वरून ९५०रुपया वर कशा पद्धतीने गेला याचे कारण स्षट करावे…१२५०रु डि.ए.पी खात १८००रू कशा पद्धतीने गेले याचे कारण स्पष्ट करावे .

शेती करीता वापरण्यात येणारा महत्वाचा घटक डिझेल ६५ रुपया वरुन १०० रु कसे झाले याचे कारण स्पष्ट करावे..शेती करीता वापरल्या जाणाऱ्या औषधीवर मागील चार वर्षांत चार पट्टीणे कर लावण्यात आले ..याच कारण सागावे..शेती करीता खताच्या भाव दुप्पट होऊन पिकाचे भाव मागील ८ वर्षात पासुन जिच्या तीथेच आहे.

मग आपली संकल्पना कुठे गेली..घरघुती वापरणारा सिलेंडर गॅसचा भाव कशामुळे वाढले व गॅसचे सिलेंडर चे अनुदान बंद करण्यात आले याचे कारण स्पषट करावे.मागिल दहा वर्षात कॉलेज च्या फिस मधे २५% वाढ झाली याचे कारण स्षट करावे… शेतकरी घाट्यात असताना कर्मचाऱ्यांच्या पगारात भरमसाठ वाढ कशाच्या आधारावर करण्यात आली..

याचे कारण स्षट करावे…. उत्तर द्या माय बाप सरकार उत्तर द्या उत्तर द्या माय सरकार