प्रहार जनशक्ती पक्षाने पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन 

Share News

🔹 मागण्या येत्या काही दिवसात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी ने दिले आश्वासन 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.10 जून) :- प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर कडून अनेक विषयाला घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

रान तळोदी हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येत होते त्यांचे पुनर्वसन वरोरा तालुक्यातील परसोडा , खातोडा या गावाजवळ नवीन गाव बसून काही लोकांचे पुनर्वसन झाले परंतु काही नागरिकांकडेच सर्व कागदपत्रे असून सुद्धा ते यापासून वंचित होते याबाबत रान तळोदी येतील नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षांचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांना भेटून सर्व माहिती दिली.

प्रहार जिल्हाप्रमुख यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सर्व माहिती दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच पुनर्वसनापासून वंचित राहिलेल्या बांधवांचा समावेश करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच तळोदी नाईक तालुका चिमूर येथील बांधव वर्षानुवर्षे सरकारी जागेवर आपले कच्चे घर बांधून राहत आहे त्यांना पट्टे देण्यात यावे ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली असता लगेच त्या संदर्भात आम्ही बैठक लावून प्रकरण निकाली लावू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.

Share News

More From Author

विद्युत स्मार्ट मीटर लावण्याविरोधात आपचे जिल्ह्याभर आंदोलन

मराठी चित्रपटाचे आभिनेञी श्री मेसवाल यांचा झाड हा चित्रपट २१जुनला रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *