शेतकऱ्यांना शेती विम्याचे पैसे मिळण्याबाबत

✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती (दि. 12 सप्टेंबर) :- आदरयुक्त निवेदन असे आहे की, भद्रावती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पिक विम्याचे पैसे अद्याप प्राप्त झालेले नाहीत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले आहे आणि त्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होत आहे. शेतकरी आपल्या मेहनतीने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विम्याचे पैसे मिळणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.  

परंतु, तालुक्यातील शेतकऱ्यांना या आर्थिक वर्षातील विम्याचे पैसे मिळाले नसल्यामुळे त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आम आदमी पार्टी तालुका भद्रावतीच्या वतीने आपणास विनंती करतो की, आपण तातडीने याबाबत लक्ष घालावे आणि संबंधित विभागांना सूचना देऊन शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे मिळवून द्यावेत.

अन्यथा येत्या चार दिवसात पीडित शेतकऱ्यांना घेऊन कृषी विभाग कार्यालय समोर तीव्र जनआंदोलन उभे करू. यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा.भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा यांच्या मार्गदर्शनात सुमित तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष सुरज खंगार अमित कसारे सतीश कुथे, प्रमोद टोंगे प्रामुख्याने उपस्थित होते.