परतीच्या पावसाने सोयाबीनची दाणादाण

🔹शेत पिकाची पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई द्या… सूरज खंगार

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.15 ऑक्टोबर) :- तालुक्यातील स्थानिक वाघेडा,(से.) धामनी,सागरा,आगरा,खोकरी, बेलगाव, मसाळ, पिर्लि, धानोली, मांगली, परिसरात गेल्या चार पाच दिवसापासून परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली या परतीच्या पावसाने शेतामध्ये असलेले सोयाबीन पीक हे धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे भद्रावती तालुक्यातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला असून चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे तेव्हा परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांची शेती पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मुस्कान भरपाई देण्यात यावी अशी मागणी श्री सूरजभाऊ खंगार आम आदमी तालुका अध्यक्ष भद्रावती यांनी केली आहे .

      सविस्तर असे की गेल्या चार पाच दिवसांमध्ये भद्रावती तालुक्यामधील वाघेडा, सागरा, बेलगाव, पिरली, मांगली. व अन्य गावामध्ये परतीच्या पावसाने मेघ गर्जनासह हजेरी लावली असल्याने सध्या शेतामध्ये सोयाबीन हे पीक उभे असून काही शेतकऱ्यांची कापणी झाली तर काहींचे पीक उभे आहे तर काही शेतकऱ्यांची पीक ढीग लागले आहे .

परंतु या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हाती आलेले पीक कायमचे नष्ट होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आधीच शेतकऱ्यांनी पीक मशागतीसाठी तसेच बी बियाणे खरेदीसाठी कर्जबाजारी होऊन आपली शेती फुलवली परंतु या अवकाळी पावसाने हाती आलेली पीक नष्ट होत असल्याने येथील शेतकरी अधिकच चिंताग्रस्त यासोबत हवालदिल झाला आहे .