अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्राध्यान्य द्या…प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.6 ऑगस्ट) :- जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती.त्यामध्ये कोणाला अपंगत्व तर लोकांना जीव गमवा लागला आहे. अनेक बांधवांचे मोठ्या प्रमाणात घरांची नुकसान सुध्दा झाले. त्यामुळे अनेक गावातील काही घरांचे अंशतः तर तर काय चे पूर्णतः नुकसान झाले असून निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशावेळी तात्काळ घराचे बांधकाम करू शकत नाही म्हणून विशेष बाब म्हणून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पूरग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शेतकरी नेते तथा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली.